Addhar News Logo  
मुख्य पान   विशेष     पत्रकार संघ   स्वतंत्र विदर्भ राज्य   समाज प्रबोधन विकास संस्था   सेवा व सुविधा   थोडक्यात   संपर्क
आज दिवस भरात   महत्वाच्या लिंक   अकोला   कात्रण   Video Watch
 
 
 
 
 
 
 
विशेष

आधार न्युज वर इंटरनेट द्वारे मोबाईलवर दिसणार अकोला जिल्हयातील घडामोडी

अकोला - विश्वाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत माहितचे सहज व गतीने प्रसारण शक्य व्हावे म्हणून प्रसिध्दी माध्यमामध्ये आता तिसरा मार्ग खुला झाला असून प्रिंट मिडिया व इलेक्ट्रानिक मिडिया सोबतच आता इंटरनेट मिडिया समोर आला आहे.

अकोला जिल्हयातील घडामोडी वृत्त आणि ज्ञान वाहिनी म्हणून आता आधार न्युज वर इंटरनेटच्या माध्यमातुन आपल्या संगणकाच्या स्क्रिनवर आणि मोबाईलवर सुध्दा पाहावयास मिळणार आहेत.


अकोला जिल्हयातील घडामोडी जनतेपर्यत पोहचाव्या म्हणुन मिडिया नेहमीच प्रयत्न करते त्यातुनच नभोवानी, दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यम या तिन्हीचा संगम म्हणुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अकोला जिल्हातील लोकांच्या माहितीविषक गरजा पूर्ण करण्यासोबतच नवे नेतृत्व विकसित करतांना सेवांचे आदान प्रदान याकामी उपयुक्त माध्यम म्हणून इंटरनेट न्यूज चॅनल सुरू करण्यात येत आहे.


ज्ञानक्रांतीला समर्थपणे सामोरे जाणारे इंटरनेट हे 21 व्या श्शतकातील मानवी जीवनाला कलाटणी देणारे प्रभावशाली माध्यम आहे. इंटरनेट हे जगभर परस्परांना जोडण्यारे बहूविध पर्यायांवर संदेश वाहनाचे साधन झाले आहे.


आजचे युग झटपट, फेसबुक आणि व्टिटरचे आहे. बदलत्या परिस्थितीत ऑनलाईन ,वेब पत्रकारितेने नव्या क्षितिजांचा श्शोध घेतला आहे.संगणक - मोबाईल व दळणवळण क्षेत्रातील विकसीत तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हयातील माहिती कोणत्याही नागरिकाला जगाच्या कोणत्याही ठिकाणी मिळविता येते. इंटरनेटचा वापर करून विविध महत्वांच्या लिंकद्वारे मानवी जीवनात विकासात्मक क्रांती, लोककल्याणासाठी समाजहिताच्या दृष्टीने लोकहितकारक प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याचे कर्तव्य आधार न्युजच्या माध्यमातुन होणार आहे.


प्रत्येकाला आपल्या जिल्हयामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये आणि जन्मस्थळ असलेल्यानंना गावी काय चालते आहे हे जाणुन घेण्याची उत्सुकता असते. ही अडचण दुर करण्यासाठी जगात कोठेही वाचता- पाहता येण्यासाठी च्या माध्यमातुन आधार न्यूज ही सुविधा कार्यान्वीत करीत आहेत. या माध्यमाद्वारे आपणाला कोणत्याही इंटरनेट सुविधा असलेल्या मोबाईल - संगणकामध्ये कोणतेही शुल्क न भरता मोफत आणि सहज लाभ घेता येईल. जिल्हयाची गरज ओळखून मोबाईलवर ताज्या बातम्या, एस.एम.एस च्या माध्यमातुन पाठविण्यात येणार अहोत. जिल्हयातील माहिती - बातम्या सात समुद्रापार जाणार शिवाय ही वेबसाईट क्षणाक्षणाला अपडेट करण्यात येत असल्याने याचा लाभ प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यत पोहचण्यासाठी आता इंटरनेट
द्वारे मोबाईलवर आपल्याला जिल्हयातील घडामोडी पहावयास मिळतील
.

 

अकोला जिल्हात 31 हजार गरीब कुटूबांचे जीवन अंधकारमय

 
अकोला - सन 2002-03 च्या दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या मुळ यादीत 1,16,249 इतकी संख्या समाविष्ट आहे. या यादीवर 60,316 आक्षेप नोंदविण्यात आले. यापैकी 31,606 आक्षेप पात्र व उर्वरित 28,710 आक्षेप अपात्र ठरविण्यात आले. परंतु अपिलपात्र ठरलेल्या 31,606 कुटुबांना कामचुकार अधिकारी, कर्मचारी बेपरवाईचा फटका बसल्याने 31,606 पात्र असतांना यादीत समावेशाचा न केल्याने अकोला जिल्हातील  31 हजार गरीब कुटूबांचे जीवन अंधकारमय झाले आहे त्यांना शासनाच्या सर्व सेवा,सवलतीपासून वंचित राहावे लागले आहे.
 
2006 मध्ये दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या याद्या प्रसिध्द केल्यानंतर त्यावर जिल्हयामध्ये 60,316 आक्षेप नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांवर प्रथम सक्षम अपिल अधिकारी (उपविभागीय अधिकारी / तहसिलदार) यांनी नेमलेल्या अधिका-यांकडुन (ग्रामसेवक, तलाठी आणि पोलिस पाटील) अपिलधा-यांनी सुनावणी घेवून एकुण 60,116 आक्षेपांपैकी 31,606 पात्र व 28,710 अपात्र आक्षेप ठरविले आहेत.
परंतु जिल्हयातील कोणत्याही अपिलधारकास पात्र आणि अपात्रतेसंबंधी संबंधित प्रथम अपिल अधिका-यांकडून निर्णयाची प्रत देण्यात आली नाही. श्शासनाने अपिलपात्र ठरलेल्या 31,606 कुटुबांच्या समावेशाचा प्रश्न अद्यापही प्रशासनाने निकाली न काढल्याने पात्र कुटुबाच नावांचा समावेश पुर्वी प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये झालाच नाहीे.
 
न्यायालयाच्या निर्देशानुसार अपिल प्रक्रिया ही निरंतर चालणारी असून जोपर्यत प्रस्तुत दारिद्रयरेषेखालील कुटुंब यादी लागू आहे तोपर्यंत अपिल प्रक्रिया चालु राहील, परंतु अकोला जिल्हयामध्ये अपिल मुद्यावर घेण्यात आलेल्या निर्णयानुसार  बदल झालाच नाही. त्यामुळे दारिद्ररेषेखालीला कुटुबाची अंतिम संगणीकृत यादी अद्यापही जि. ग्रा. वि. यंत्रणा अकोलाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे.
लोकशाही दिनामध्ये सदर विषयाबाबत तक्रार दाखल आहेत परंतु सदर तक्रारीबाबत कोणताही  विचार न करता प्रकल्प संचालक जि. ग्रा. वि. यंत्रणा अकोला यांनी अपिलार्थीचे नावाचा समावेश करण्याबाबत गोलमोल आदेश काढूनही प्रक्रिया रखडून ठेवली आहे.
 
अपिलामध्ये पात्र ठरलेल्या कुटुबांच्या समावेशाबाबत आयुक्त तथा श्शासनाला खोटी माहिती देवून पात्र लाभ्यार्थर््यांवर अन्याय केला. 10 पंचवार्षिक योजनेत दारिद्रय निर्मुलनाचा नारा दिला गेला खरा पण अंमलबजावणी होत असतांना या घटकाला प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि लागत आहे. हरकती आक्षेप नोंदविण्यात आले मात्र त्यांचा निपटारा करण्यास तब्बल दहा वर्षाचा कालावधी लागला ही दुर्देवी बाब आहे. त्यामुळे गरीबांना त्यांच्या शंकाचे निरसन न घेताच दारिद्रय निर्मुलन कार्यक्रम कागदावर  आटोपात घेतला आहे.
 
दारिद्रय रेषेखालील कुटूंब गणना 2002 चे यादीचा अंतीम स्वरूप देतांना जिल्हयात केंद्र व राज्य सरकारसह सवौच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्याने गोरगरिबांना शासकीय योजनांचा लाभ मिळू शकला नाही. शासनाच्या योजना अतिशय चांगल्या असतात लोक कल्याणकारी असतात यात कुणाचे दुमत असल्याचे कारण नाही मात्र योग्य अंमलबजावणी अभावी त्या रेंगाळतात आणि निकाली काढतांना घाई केली जाते परिणामी अपेक्षीत हेतू साधला जात नाही अशा प्रतिक्रिया दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ट होऊ न शकलेल्या कुटूंबियांनी व्यक्त केल्या आहेत. ते अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.